Wednesday, December 14, 2016

Be the CEO of your own Life ...


Pls purn vacha
अप्रतिम लेख ....
.....परत परत वाचा
नक्की वाचा......

Be the CEO of your own Life ...

बघा फरक पडेल आपल्या आयुष्यात...
👌👌👌👌👌👌

दोन दिवसांपूर्वीची गोष्ट..
 कुटुंबासह कुठल्यातरी मॉलमध्ये होतो.
मुलगा ‘प्ले झोन’ मध्ये, सौ. (विन्डो) शॉपिंगमध्ये आणि मी एसीची छान गार हवा अंगावर घेत एका कोपऱ्यात पेपर वाचत बसलो होतो.
पेपर खरं तर, नावाला.
माणसं वाचत बसलो होतो. विविध चेहऱ्यांची, आकारांची माणसं जणू ‘आज जगाचा शेवटचा दिवस असावा’ असे भाव आणून शॉपिंग करत होती.
(एवढ्या वस्तू विकत घेऊन माणसं त्या वस्तू घरात कुठे ठेवतात, हा मध्यमवर्गीय प्रश्न मला कायम सतावतो.असो.)

माझं ‘माणसं-वाचन’ चालू असतानाच माझ्या शेजारी एक तरुण येऊन बसला.
जेमतेम चाळीशीचा असावा.
 जीन्स आणि खोचलेला टी शर्ट. पायात बूट.
अंगावर ब्रुट.
हातात मराठी पुस्तक.
खिशातला शुभ्र रुमाल काढून त्याने कपाळावरचा घाम पुसला.
रुमालाची (होती तशी) व्यवस्थित घडी घातली आणि (त्याच) खिशात ठेवली.
त्याच्या हालचाली शांत झाल्यावर त्याने पुस्तक उघडले.
ते पुस्तक माझ्या आवडत्यांपैकी एक होतं.
 न राहवून मी म्हटलं, ‘मस्त पुस्तक आहे.
’ त्याने माझ्याकडे बघत हसून मान हलवली..

पाच एक मिनिटांनी तो माझ्याकडे वळून म्हणाला,
’वाचन आवडतं?’

‘प्रचंड. रीडिंग इज माय ‘फर्स्ट लव्ह’.
’ आजूबाजूला ‘सौ’ नाही हे बघत मी म्हटलं.

‘किती वाचता रोज?’
‘रोज असं नाही…अं.. अं…काही खास ठरवलेलं नाही.
इच्छा झाली की वाचतो.’
अनपेक्षित योर्करला कसंबसं खेळत मी म्हटलं.

‘खायला आवडतं?’
 कॉन्जीक्युटीव्ह योर्कर.

‘प्रचंड. इटिंग इज माय ‘सेकंड लव्ह’.’

‘हो?  मग रोज जेवता की इच्छा होईल तेव्हा….?’

‘नाही नाही…रोज दोन वेळा..
आणि मधे-मधे काहीना काही खादाडी चालू असतेच..
’ हिट विकेट !

तो तरुण हसला. म्हणाला, ‘मी दिवसभरात एक तास वाचतो. वाचल्याशिवाय झोपत नाही. आंघोळ, जेवण.. तसंच वाचन !’

‘बरा वेळ मिळतो तुम्हाला.’
दयनीय चेहरा करत मी म्हटलं..

‘वेळ मिळत नाही. मी काढतो.
‘वेळ’ ही जगातली सगळ्यात
 ‘टेकन फॉर ग्रान्टेड’ गोष्ट आहे असं मी मानतो..

 फॉर दॅट मॅटर, आयुष्यच घ्या ना ! फारच गृहीत धरतो आपण आयुष्याला !
 ‘मी रिटायर झाल्यावर भरपूर वाचन करणारे’ असं कोणी म्हटलं ना,

की माझी खात्री आहे,
नवज्योत सिंग सिद्धूसारखा रेड्यावर हात आपटत तो ‘यम’ हसत असेल !’

 मी हसलो. तसा किंचित गंभीर होत त्याने विचारलं, ‘तुम्ही कधी पाहिलंय यमाला?’

मी आणखी हसू लागलो.
‘आय ऍम प्रीटी सिरीयस..
 तुम्ही पाहिलंय यमाला ?

मी पाहिलंय.
दोन वर्षांपूर्वी.
रस्ता क्रॉस करत होतो.
 समोरून भरधाव गाडी आली.
त्या दिव्यांच्या प्रकाशझोतातही मी अंधार पाहिला.
त्या दोन सेकंदात मला ‘मृत्यूने’ दर्शन दिलं.
त्यानंतर जागा झालो तो हॉस्पिटलमध्येच.
गंभीर इजा होऊन सुद्धा मी कसाबसा वाचलो होतो..
 हॉस्पिटलमधून घरी आलो तो नवा जन्म घेऊन..
 मी ‘देव’ पाहिला नव्हता पण ‘मृत्यू’ पाहिला होता. मृत्यू तुम्हाला खूप शिकवतो.

माझी मृत्यूवर श्रद्धा जडली. आजूबाजूला रोज इतके मृत्यू दिसत असूनही ‘मी’ अमर राहणार असं ज्याला वाटतं, तो माणूस !

 तुम्हाला माहितीय, माणूस मृत्यूला का घाबरतो?’

‘अर्थात ! मृत्यूनंतर त्याचे सगे सोयरे कायमचे दुरावतात..
 मृत्यूमुळे माणसाच्या इच्छा अपूर्ण राहतात.’ मी म्हटलं..

‘साफ चूक !
माणूस यासाठी घाबरतो कारण मृत्यूनंतर ‘उद्या’ नसतो !’

‘मी समजलो नाही.’

‘प्रत्येक काम आपल्याला ‘उद्यावर’ टाकायची सवय असते..

वाचन, व्यायाम, संगीत ऐकणे…
गंमत म्हणजे,
आहेत ते पैसे देखील आपण ‘आज’ उपभोगत नाही..
 ते कुठेतरी गुंतवतो..
भविष्यात ‘डबल’ होऊन येतील म्हणून !

या ‘उद्या’ वर आपला फार भरवसा असतो..
मग तो आपल्या जगण्याचा एक भाग बनतो..
 आपण मृत्यूला घाबरतो कारण मृत्यू तुम्हाला हा ‘उद्या’ बघायची संधी देत नाही !

मृत्यू म्हणजे – आहोत तिथे, आहोत त्या क्षणी फुल स्टॉप !

 खेळ ऐन रंगात आला असताना कुणीतरी येऊन तुम्हाला खेळाच्या बाहेर काढावं, तसा मृत्यू तुम्हाला या जगातून घेऊन जातो.

तुमच्यावरील या ‘अन्याया’ विरुद्ध आवाज उठवायला देखील तुम्ही उरत नाही..

माझ्या मृत्यूनंतर मी माझा लाडका ‘उद्या’ पाहू शकणार नाही, या हतबलतेला माणूस सगळ्यात जास्त घाबरतो..

 म्हणून हॉस्पिटलमधून घरी आल्यावर ठरवलं,
 यापुढचं आयुष्य उघड्या डोळ्यांनी जगायचं..

 इतके दिवस जेवण नुसतंच ‘गिळलं’. या पुढे एकेका घासाचा मजा घ्यायचा..
आयुष्याची ‘चव’ घेत जगायचं. ’

‘म्हणजे नक्की काय केलं?’
माझी उत्सुकता आता वाढली होती.

‘माझ्या आयुष्याची जबाबदारी मी स्वतःवर घेतली..

 मी माझ्या आयुष्याचा Chief Executive Officer झालो !’

‘कंपनीचा सीईओ इतपत ठीक आहे. आयुष्याचा
‘सीईओ’ वगैरे…जरा जास्तच होत नाही का?’ मी विचारलं.

‘वेल… तुम्हाला काय वाटतं हे

Wednesday, November 9, 2016

Was Mukesh Ambani already aware of Indian Government's decision of demonetizing ₹500 and ₹1000 notes?

Please don't be misguided by such low level political propaganda. Keep your mind open and look at the facts.
Mukesh Ambani bought the company in 2010. This is a matter of public record and easily verifiable.
He bought a company in 2010 to convert his black money to white in 2017 because he knew Narendra Modi will win the 2014 elections and change the large denomination notes in 2016 till december end. That's as absurd as it sounds. Even if he employed the best astrologer in the world, it would still be stretching it too far to even think this has an iota of truth.
Further from wikipedia, I can add this.

Edit: sorry, missed the point. Maybe he had developed a time machine which he used in future to travel back in time and gave the news about upcoming events to himself.
Sorry, couldn't resist. The question seems to be asking for such an answer.

Sunday, October 30, 2016

Be the CEO of your own Life

अप्रतिम लेख ....
.....परत परत वाचा
नक्की वाचा......




Be the CEO of your own Life ...





बघा फरक पडेल आपल्या आयुष्यात...



दोन दिवसांपूर्वीची गोष्ट..
 कुटुंबासह कुठल्यातरी मॉलमध्ये होतो.
मुलगा ‘प्ले झोन’ मध्ये, सौ. (विन्डो) शॉपिंगमध्ये आणि मी एसीची छान गार हवा अंगावर घेत एका कोपऱ्यात पेपर वाचत बसलो होतो.
पेपर खरं तर, नावाला.
माणसं वाचत बसलो होतो. विविध चेहऱ्यांची, आकारांची माणसं जणू ‘आज जगाचा शेवटचा दिवस असावा’ असे भाव आणून शॉपिंग करत होती.
(एवढ्या वस्तू विकत घेऊन माणसं त्या वस्तू घरात कुठे ठेवतात, हा मध्यमवर्गीय प्रश्न मला कायम सतावतो.असो.)


माझं ‘माणसं-वाचन’ चालू असतानाच माझ्या शेजारी एक तरुण येऊन बसला.
जेमतेम चाळीशीचा असावा.
 जीन्स आणि खोचलेला टी शर्ट. पायात बूट.
अंगावर ब्रुट.
हातात मराठी पुस्तक.
खिशातला शुभ्र रुमाल काढून त्याने कपाळावरचा घाम पुसला.
रुमालाची (होती तशी) व्यवस्थित घडी घातली आणि (त्याच) खिशात ठेवली.
त्याच्या हालचाली शांत झाल्यावर त्याने पुस्तक उघडले.
ते पुस्तक माझ्या आवडत्यांपैकी एक होतं.
 न राहवून मी म्हटलं, ‘मस्त पुस्तक आहे.
’ त्याने माझ्याकडे बघत हसून मान हलवली..

पाच एक मिनिटांनी तो माझ्याकडे वळून म्हणाला,
’वाचन आवडतं?’

‘प्रचंड. रीडिंग इज माय ‘फर्स्ट लव्ह’.
’ आजूबाजूला ‘सौ’ नाही हे बघत मी म्हटलं.

‘किती वाचता रोज?’
‘रोज असं नाही…अं.. अं…काही खास ठरवलेलं नाही.
इच्छा झाली की वाचतो.’
अनपेक्षित योर्करला कसंबसं खेळत मी म्हटलं.

‘खायला आवडतं?’
 कॉन्जीक्युटीव्ह योर्कर.

‘प्रचंड. इटिंग इज माय ‘सेकंड लव्ह’.’

‘हो?  मग रोज जेवता की इच्छा होईल तेव्हा….?’

‘नाही नाही…रोज दोन वेळा..
आणि मधे-मधे काहीना काही खादाडी चालू असतेच..
’ हिट विकेट !

तो तरुण हसला. म्हणाला, ‘मी दिवसभरात एक तास वाचतो. वाचल्याशिवाय झोपत नाही. आंघोळ, जेवण.. तसंच वाचन !’

‘बरा वेळ मिळतो तुम्हाला.’
दयनीय चेहरा करत मी म्हटलं..

‘वेळ मिळत नाही. मी काढतो.
‘वेळ’ ही जगातली सगळ्यात
 ‘टेकन फॉर ग्रान्टेड’ गोष्ट आहे असं मी मानतो..

 फॉर दॅट मॅटर, आयुष्यच घ्या ना ! फारच गृहीत धरतो आपण आयुष्याला !
 ‘मी रिटायर झाल्यावर भरपूर वाचन करणारे’ असं कोणी म्हटलं ना,

की माझी खात्री आहे,
नवज्योत सिंग सिद्धूसारखा रेड्यावर हात आपटत तो ‘यम’ हसत असेल !’

 मी हसलो. तसा किंचित गंभीर होत त्याने विचारलं, ‘तुम्ही कधी पाहिलंय यमाला?’


मी आणखी हसू लागलो.
‘आय ऍम प्रीटी सिरीयस..
 तुम्ही पाहिलंय यमाला ?

मी पाहिलंय.
दोन वर्षांपूर्वी.
रस्ता क्रॉस करत होतो.
 समोरून भरधाव गाडी आली.
त्या दिव्यांच्या प्रकाशझोतातही मी अंधार पाहिला.
त्या दोन सेकंदात मला ‘मृत्यूने’ दर्शन दिलं.
त्यानंतर जागा झालो तो हॉस्पिटलमध्येच.
गंभीर इजा होऊन सुद्धा मी कसाबसा वाचलो होतो..
 हॉस्पिटलमधून घरी आलो तो नवा जन्म घेऊन..
 मी ‘देव’ पाहिला नव्हता पण ‘मृत्यू’ पाहिला होता. मृत्यू तुम्हाला खूप शिकवतो.


माझी मृत्यूवर श्रद्धा जडली. आजूबाजूला रोज इतके मृत्यू दिसत असूनही ‘मी’ अमर राहणार असं ज्याला वाटतं, तो माणूस !


 तुम्हाला माहितीय, माणूस मृत्यूला का घाबरतो?’

‘अर्थात ! मृत्यूनंतर त्याचे सगे सोयरे कायमचे दुरावतात..
 मृत्यूमुळे माणसाच्या इच्छा अपूर्ण राहतात.’ मी म्हटलं..



‘साफ चूक !
माणूस यासाठी घाबरतो कारण मृत्यूनंतर ‘उद्या’ नसतो !’

‘मी समजलो नाही.’


‘प्रत्येक काम आपल्याला ‘उद्यावर’ टाकायची सवय असते..

वाचन, व्यायाम, संगीत ऐकणे…
गंमत म्हणजे,
आहेत ते पैसे देखील आपण ‘आज’ उपभोगत नाही..
 ते कुठेतरी गुंतवतो..
भविष्यात ‘डबल’ होऊन येतील म्हणून !

या ‘उद्या’ वर आपला फार भरवसा असतो..
मग तो आपल्या जगण्याचा एक भाग बनतो..
 आपण मृत्यूला घाबरतो कारण मृत्यू तुम्हाला हा ‘उद्या’ बघायची संधी देत नाही !

मृत्यू म्हणजे – आहोत तिथे, आहोत त्या क्षणी फुल स्टॉप !

 खेळ ऐन रंगात आला असताना कुणीतरी येऊन तुम्हाला खेळाच्या बाहेर काढावं, तसा मृत्यू तुम्हाला या जगातून घेऊन जातो.

तुमच्यावरील या ‘अन्याया’ विरुद्ध आवाज उठवायला देखील तुम्ही उरत नाही..

माझ्या मृत्यूनंतर मी माझा लाडका ‘उद्या’ पाहू शकणार नाही, या हतबलतेला माणूस सगळ्यात जास्त घाबरतो..

 म्हणून हॉस्पिटलमधून घरी आल्यावर ठरवलं,
 यापुढचं आयुष्य उघड्या डोळ्यांनी जगायचं..

 इतके दिवस जेवण नुसतंच ‘गिळलं’. या पुढे एकेका घासाचा मजा घ्यायचा..
आयुष्याची ‘चव’ घेत जगायचं. ’

‘म्हणजे नक्की काय केलं?’
माझी उत्सुकता आता वाढली होती.


‘माझ्या आयुष्याची जबाबदारी मी स्वतःवर घेतली..

 मी माझ्या आयुष्याचा Chief Executive Officer झालो !’

‘कंपनीचा सीईओ इतपत ठीक आहे. आयुष्याचा
‘सीईओ’ वगैरे…जरा जास्तच होत नाही का?’ मी विचारलं.

‘वेल… तुम्हाला काय वाटतं हे माझ्यासाठी महत्वाचं नाही..

आयुष्य कसं जगायचं याचे नियम मी ‘माझ्यापुरते’ केलेत.
त्यामुळे…’
‘मग..तुमच्या कंपनीत किती माणसं आहेत?’ त्याला मधेच तोडत, मस्करीच्या सुरात मी विचारलं.

‘म्हटलं तर खूप, म्हटलं तर कोणीच नाही.’ तो खांदे उडवत म्हणाला.

मला न कळल्याचं पाहून तो पुढे बोलू लागला..
 ‘मी फक्त माझ्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स सोबत डील करतो..

 दे व्हर्च्युअली कंट्रोल माय लाईफ.

माझ्या बोर्डवर विविध माणसे आहेत..

फरहान अख्तर,
शिवाजी महाराज,
अब्दुल कलाम,
डॉ.बी आर आंबेडकर
चार्ली चॅप्लीन,
गांधीजी,
अमिताभ,
हेलन केलर,
जे आर डी टाटा…..’

माझ्या चेहऱ्यावरील बदलत जाणारे भाव न्याहाळत त्याने आणखी काही नावे घेतली.

‘या लोकांबद्दल वाचलं तेव्हा एक लक्षात आलं.
या प्रत्येकामध्ये काहीना काही वैशिष्ट्य आहे.
काही क्वालिटीजमुळे मला ही माणसं ग्रेट वाटतात.

 मी काय करतो… अं…उदाहरण देतो…
समजा खोटं बोलण्यावाचून पर्याय नाही अशा परिस्थितीत सापडलो की माझे ‘एथिक्स डायरेक्टर’ गांधीजींना विचारतो, काय करू?

मग ते सांगतील ते करतो.

 व्यायाम करायला जाताना सकाळी उठायचा कंटाळा आला तर माझे ‘हेल्थ डायरेक्टर’ फरहान अख्तर मला काय म्हणतील, या विचाराने मी उठून बसतो आणि व्यायाम करायला जातो.

कधीतरी काहीतरी घडतं आणि खूप निराश वाटतं.

मग माझ्या ‘इन्स्पीरेशन डायरेक्टर’ हेलन केलरना पाचारण करतो. त्यांना भेटून आपल्या अडचणी फारच मामुली वाटू लागतात.

कधी दुःखी झालो तर ‘इंटरटेनमेंट डायरेक्टर’ चार्ली चॅप्लीन भेटायला येतात…’

माझ्या चेहऱ्यावरील विस्मयचकित भाव पाहून तो म्हणाला..
’मला माहितीय की ऐकायला हे सगळं विचित्र वाटत असेल.
पण एक गोष्ट सांगतो. आयुष्य जगणं ही जर परीक्षा असेल, तर प्रत्येक माणसाने स्वतःचा ‘सीलॅबस’ बनवावा हे उत्तम !

आपण अनेकदा ‘इतरांप्रमाणे’ आयुष्य जगायचा प्रयत्न करतो आणि तिथेच फसतो..

जगायचं कसं? या प्रश्नावर चिंतन करणारी लाखो पुस्तके आज बाजारात आहेत.

हजारो वर्षे माणूस या प्रश्नाचं उत्तर शोधतोय..

 गौतम बुद्धांनी मात्र फक्त चार शब्दांत उत्तर दिलं -Be your own light..

मला तर वाटतं, याहून सोपं आणि याहून कठीण स्टेटमेंट जगात दुसरं नसेल !’


मी त्या तरुणाला नाव विचारलं. त्याने सांगितलं. आम्ही एकमेकांचा निरोप घेतला.



चार पावलं चालून गेल्यावर तो तरुण पुन्हा वळून माझ्याकडे आला. म्हणाला, ‘सगळ्यात महत्वाचं सांगायचं राहिलं.

मी एका ऍक्सिडेंटमध्ये वाचलो आणि इतकं काही शिकलो.

 तुम्ही…प्लीज..कुठल्या ऍक्सिडेंटची वाट पाहू नका !’ आम्ही दोघेही हसलो.

अपघात फक्त वाहनांमुळेच होतात, असं थोडीच आहे?
ओळखपाळख नसलेला तो तरुणही अपघातानेच भेटला की !

घरी जायला आम्ही रिक्षात बसलो. ‘प्ले झोन’ मध्ये खेळून पोरगं आधीच दमलं होतं..
 वाऱ्याची झुळूक रिक्षात येऊ लागली..

 मांडीवर बसल्या बसल्या मुलगा झोपून गेला होता..

त्याच्या मऊ मऊ केसांमधून हात फिरवताना संध्याकाळच्या गप्पा आठवत होत्या.

मनात आलं, ‘आपल्या पोराने जर असे ‘बोर्ड ऑफ डायरेक्टर्स’ नेमले, तर त्यात ‘त्याचा बाप’ असेल का?’
परवाच्या रात्री बराच वेळ जागा राहिलो.

कोण जाणे, कदाचित हाच प्रश्न यापुढील आयुष्य ‘चवीने’ जगत राहायची उर्जा देत राहील !

प्रत्येकाने वाचावा अअप्रतिम लेख ....
.....परत परत वाचा
नक्की वाचा......




Be the CEO of your own Life ...





बघा फरक पडेल आपल्या आयुष्यात...

Monday, September 12, 2016

बेबी कोण आहे?"


नवरा अंघोळीला गेल्यावर त्याच्या मोबाईलवर
मेसेज येतो ...
.
"हाय, गुड मॉर्निंग डियर"
(मेसेज फ्रॉम बेबी)
सहज म्हणून बायको तो मेसेज वाचते. विचारात पडते,
ही "बेबी" कोण आता ?
.
नवरा बाथरूममधून आल्यावर बायको त्याला कुण्या
बेबीचा मेसेज आल्याचे सांगते. नवरा हसतो. आणि
मोबाईल घेऊन रिप्लाय करतो,
"हाय बेबी, हाऊ आर
यु ?" आणि आपल्या कामाला लागतो.
तो रिप्लाय
देखील बायको पाहते.
मग दिवसभर डोक्यात विचार
सुरू होतात, कोण असेल ही बेबी ?
.
संध्याकाळी नवरा आल्यावर त्याला ती विचारते,
"ही बेबी कोण आहे हो ?"
नवरा केवळ हसतो आणि उत्तरं न देता आपल्या
कामाला लागतो.
असेच एक दोन दिवस जातात.
पुन्हा एके सकाळी मेसेज येतो,
.
"हाय, आज तरी भेटणार का ?
खूप आठवण
येतेय तुझी" (मेसेज फ्रॉम बेबी)
.
हे वाचून मात्र बायकोच्या मनात संशय वाढू लागतो. अधून मधून अशाच प्रकारचे मेसेज यायचे,
नवराही रिप्लाय द्यायचा आणि हे सगळे पाहून बायकोचा संशय वाढायचा. आणि एकेदिवशी
नवऱ्याच्या खिशात सिनेमाची दोन तिकिटे तिला सापडतात.
त्याचे रूपांतर शेवटी तिच्या प्रचंड रागात होते.
दोघात कडाक्याचे भांडण होते.
तिच्या मनात अढी बसलेली त्यात भांडण पेटलेले.
त्या भरात
बायको त्या दिवशी नवरा ऑफिसला गेल्यावर
त्याच्यासाठी एक चिट्ठी ठेवते "मी घर सोडून
माहेरी जातेय, कायमची"
.
****
नवरा घरी आल्यावर चिट्ठी वाचून सुन्न होतो !!
***
पंधरा दिवस जातात. आणि एकेदिवशी बायको
आपल्या गावातच असलेल्या ज्या माहेरी राहत
असते, त्या घराची बेल वाजते. बायकोच दार उघडते.
दारात दहा वर्षाची एक अतिशय गोड मुलगी उभी !!
ती विचारते, "अमुकच्या मिसेस तुम्हीच न ?"
बायको "हो" म्हटल्यावर ती मुलगी तिच्या
हातातले एक पत्र बायकोला देते. बायको पत्र वाचू
लागते.
****
"प्रिय सखी, ज्या "बेबी"वरून इतके वादळ उठले आणि
तू घर सोडून गेलीस, तीच ही "बेबी" आहे. जिने आता
तुला हे पत्र दिलेय. अनाथ आश्रमातील ही गोड
मुलगी. हिच्याच सोबत मी बोलायचो, सिनेमाला
जायचो. जेव्हा तू पहिल्यांदा विचारलेस कि "हे
बेबी कोण आहे?" तेव्हा मुद्दाम सांगितले नाही.
म्हटलं पाहूया, जरा गंमत करूया. मात्र तुझा "बेबी
संशय" वाढतच गेला. आणि तिथेच विश्वासाला तडा
गेला. तरीही शेवटी मी थेट बेबीशी तुझी भेट
घडवणार होतो. पण तू ऐकण्याच्या मनस्थितीत
नव्हतीस. आणि रागाच्या भरात निघून गेलीस"
आणि हो, अजून एक, ही जी बेबी तुझ्या समोर उभी
आहे न, ती दुसरी तिसरी कोणी नसून तुझीच मुलगी
आहे"
थांब ! दचकू नकोस. शांतपणे पुढचे वाच !!
आपलं लग्न व्हायच्या दोन वर्षे आधीची घटना. तू
कॉलेजात लास्ट इयरला होतीस. तिथल्या एका
प्राध्यापकाने नोट्स देण्याच्या बहाण्याने घरी
बोलावून तुला कॉफीतून गुंगीचं औषध दिलेलं आणि
नंतर "नको ते कृत्य" केलेलं. तुझी चूक नसतानाही
निसर्गाने मात्र काम केले. नंतर प्रयत्न करूनही
अबॉर्शन घडलं नाही. इभ्रतीचा बोभाटा नको
म्हणून घरच्यांनी तुला सहा महिने घरातच झाकलेलं.
तुझे वडीलच डॉक्टर असल्याने फारसा बोभाटा न
होता "नको" ते बाळ जन्मल. पुढे तुझ्या वैवाहिक
जीवनात अडसर ठरणारे हे बाळ तुझ्या वडलांनी
गावातल्या अनाथ आश्रमात सोडून दिलेलं !
तेच बाळ म्हणजे ही बेबी !! वाटल्यास तिच्या
डाव्या खांद्यावरचा तीळ पाहून खात्री करून घे
जो तू तिला पहिल्यांदा रडताना पाहिला
असशील. किंवा थेट वडिलांकडून खात्री करून घे.
***
(बायको पटकन त्या मुलीजवळ जाऊन खांद्यावरील
तीळ पाहते. तीळ दिसताच ती मनातून कोसळते.
डोळे भरून आलेले. पण पत्र अजून बाकी असतं. ती पुढे
वाचायला सुरुवात करते )
***
"आता हे सगळं मला कस माहित ?
तर तुझ्या पापभिरू वडिलांनीच न राहवून आपल्या लग्नाच्या एक
महिना आधी मला भेटून हे सांगितलं व वाटल्यास
अजूनही तुम्ही लग्न मोडू शकता, सुचवलं.
तरीही मी तुला स्वीकारलं.
कारण झाल्या प्रकारात तुझी चूक
काहीच नव्हती. आणि आपले लग्न झाले. पण मीच अधून मधून त्या बेबीला जाऊन भेटायचो. तिच्या सहवासात छान वाटायचे.
लळा लावला होता पोरीने.
.
बास !! माझे सांगून संपलंय सगळं !
आता विचार कर
आणि जर पुन्हा आपण एकत्र यायचा निर्णय झाला असला तर आणि तरच ग्यालरीत ये"
.
सदैव तुझाच xxxxx "
.
****
बायको ताडकन धावत धावत ग्यालरीत जाते.
खाली रस्त्यावर नवरा उभा असतो शांतपणे हसतमुख !!
आणि इकडे हिच्या डोळ्यात अश्रूचा महापूर !!
.
****
कारण कोणतेही असो,
दोघांमध्ये संशयाला कधीच
थारा देऊ नका !!
शांतपणे समोरासमोर बसून निरसन
करून घेताना मनात मोकळेपणा ठेवा.
कारण जगात "संशय" हा एकमेव असा रोग आहे,
ज्यावर अद्याप औषध निघालेले नाही !! त्यावर औषध एकच ...
नात्यात वाद नको संवाद हवा

Friday, September 9, 2016

ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो.


एक माणूस जंगलात शिकारीला गेला होता.
त्या दिवशी शिकार काही मिळाली नाही.
शेवटी तहान लागली म्हणून पाणी पिण्यासाठी तो जंगलातल्या तळ्यावर थांबला.
हातातला तीर कामठा खाली ठेवून तो पाणी प्यायला लागला,
एवढयात समोरून वाघ येताना त्याला दिसला.
तो भीतीने पळायला लागला. वाघ पाठीमागे येतोय, हे बघून त्यांन जवळच्या झाडावर चढायला सुरुवात केली.
I पण झाडावर आधीच चढून बसलेलं अस्वल बघून त्याची भीतीने गाळण उडाली.
वर अस्वल, खाली वाघ! आता काय करायचं ?तेवढयात अस्वल त्याला म्हणाला, "घाबरु नको. वर ये. मी तुला काही करणार नाही. मी वाघापासून जीव वाचविण्यासाठीच इथे आलोय."
माणूस मग वर गेला. वाघ मात्र झाडाखाली बसून होता.
रात्र झाली तशी माणसाला झोप लागली.
हे बघून वाघ अस्वलाला म्हणाला, "हा परका माणूस. त्याला खाली ढकलून दे. माझी भूक भागली की मी तुला काही करणार नाही."
पण अस्वलानं तसं केलं नाही.
थोड्या वेळानं माणसाला जाग आली. मग अस्वलानं जरा डोळे मिटले. वाघानं ही संधी साधली.
तो माणसाला म्हणाला, "अस्वलाला खाली ढकल. माझी भूक भागेल आणि तुझा जीव वाचेल."
माणसानं क्षणाचाही विचार न करता अस्वलाला धक्का दिला.
सुदैवाने अस्वलानं पंजानं फांदीला घट्ट पकडले होते. त्यामुळे ते पडलं नाही.
पण त्याला माणसाचा विश्वासघातकी स्वभाव कळला.
ते म्हणालं,
"मी तुझ्याशी दगा केला नाही. परंतु तू मात्र मला फसवलंस.
"पशूंवर" विश्वास ठेवता येतो, "माणसांवर" नाही, हे मला आज समजलं."
ध्यानात ठेवा मित्रांनो
पाठीत खंजर खुपसुन कोणाचेही भले झाले नाही म्हणून अस्वलाचे हे शब्द खरे ठरवायचे की खोटे, हे आपल्या हातात आहे.
ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो.
सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात पण त्या सुटणार्या असतात,याउलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही.

Efficient Management & Effective Execution.


Ratan Tata was holding a weekly meeting with tata steel staff at a football ground in jamshedpur.

While watching the football match, to strike a conversation, a worker took up an issue. He told Tata Quality of toilets for workers is terribly bad with leaking taps, clogged commodes and unbearable stink. No maintenance is being done for workers toilets,  whereas the maintenance of officers toilet is  very good, clean and neat with air purifiers, dryers, hand towels,  etc
                                                       
Ratan Tata asked his top executive how much time he needs to set it right. He said 1 month. Ratan Tata said I would rather do it in half a day and asked for a carpenter.

Next day toilet sign board on workers toilet was changed to officers  and officers to byworkers. There were instructions to change it back every fortnight.
                                             
Quality of both toilets became same..... Good.

Excellent example of Efficient Management & Effective Execution.
Forwarded post

Friday, September 2, 2016

माणसे ओळखायला शिका 👍


एक बोधकथा

एकदा एका मुलाने साप पाळला. तो त्या सापावर प्रेम करत होता आणि त्याच्यासमवेतच घरी रहात होता. एकदा साप आजारी पडला. त्याने खाणे-पिणे सोडून अनेक दिवस झाले. त्यामुळे मुलाला त्याची काळजी वाटली. मुलाने त्याला एका पशुवैद्याकडे नेले. पशुवैद्याने सापाला पडताळल्यानंतर पशुवैद्याचे त्या मुलाशी पुढील संभाषण झाले.

पशुवैद्य : साप तुझ्यासमवेतच झोपतो का ?
मुलगा : हो.
पशुवैद्य : साप तुला अगदी चिकटून झोपतो का ?
मुलगा : हो.
पशुवैद्य : रात्री साप संपूर्ण शरीर ताणतो का ?
मुलगा (अतिशय आश्‍चयाने) : हो, वैद्यजी ! हा रात्री शरीर पूर्णपणे ताणतो; पण मला त्याची ही स्थिती पहावत नाही आणि मी कुठल्याही प्रकारे त्याचे हे दुःख दूर करण्यास असमर्थ आहे !
पशुवैद्य : या सापाला कोणताच आजार झालेला नाही. जेव्हा रात्री हा शरीर पूर्णपणे ताणतो, तेव्हा प्रत्यक्षात तो तुला गिळण्यासाठी त्याचे शरीर तुझ्या लांबीएवढे करण्याचा प्रयत्न करतो. तो सतत अनुमान घेत आहे, तुझे पूर्ण शरीर चांगल्या प्रकारे गिळता येईल कि नाही ....अन् गिळलेच, तर तो पचवू शकेल कि नाही ? ?...

या गोष्टीवरून हे शिकायला मिळते की, जे तुमच्यासमवेत सतत असतात, ज्यांच्यासमवेत तुम्ही खाता-पिता, बसता किंवा झोपता, ते सगळेच तुमच्यावर तेवढेच प्रेम करतात, असे नाही. त्यातील काही जण तुम्हाला गिळण्यासाठी स्वतःचा आकार हळूहळू मोठा करत असतात आणि तुम्ही भावनिक होऊन त्यांची स्थिती पाहून द्रवत असता ....जरा सांभाळून !
तात्पर्य : माणसे ओळखायला शिका 👍🏻